Skip to main content

भारतातील पारंपारिक सामाजिक चळवळी

 घटक  क्रमांक तीन

*भारतातील  पारंपारिक सामाजिक चळवळी

Ø अ)ब्राह्मो समाज:

Ø राजा राममोहन राय यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना बंगाल येथे इ.स. १८२८ मध्ये केली.

Ø राजा राम मोहन राय यांना राजा ही पदवी ब्रिटिशांकडून बहाल करण्यात आली.

Ø राजा राम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजाचे नेतृत्व केले. देवेंद्रनाथ टागोर यांनी १८३८ रोजी ब्राम्हो समाज मध्ये प्रवेश केला.

Ø राजा राममोहन रॉय यांनी हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी १८२६ मध्ये वेदांचा अभ्यास करणारे ‘वेदांत महाविद्यालय’ स्थापन केले.

Ø हिंदू समाजाला इंग्रजी शिक्षण देण्यासाठी १८१७ साली  ‘हिंदू कॉलेज’ ची स्थापना केली.

Ø ब्राह्मो समाज द्वारे स्त्री शिक्षणासाठी आग्रही होता म्हणून त्यांनी नॉर्मल स्कूल व विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली.

Ø ब्राम्हो समाजाच्या प्रयत्नाने लॉर्ड बेटिंग यांच्या सहकार्याने १८२९ साली  सती प्रथा विरोधी  कायदा आला.

Ø ब्राम्हो समाजाचे तत्वज्ञान :

Ø परमेश्वर एकच असून तो निर्गुण आणि निराकार सर्वव्यापी आहे.

Ø मूर्तिपूजा कर्मकांड अनेक ईश्वरवाद अमान्य आहे .

Ø ब्राह्मण समाजाने मानवतावादाचा पुरस्कार करून चारित्र्य नैतिकता सद्गुण यावर विशेष भर दिला.

Ø ब्राह्मो समाजाचे सभासदत्व स्त्रियांना सुद्धा भेटले पाहिजे.

Ø ब्राह्मो समाज ब्राह्मो समाज बहुपत्नीत्व सतीची चाल बालविवाह इत्यादी स्त्रियांविषयी च्या अनिष्ट प्रतीच्या विरोधी होता.

Ø ब्राम्हो समाजात सर्व जाती धर्माच्या व्यक्तीला प्रवेश असे.

o   ब्राम्हो समाजाचे कार्ये :-

Ø १)ब्राह्मो समाज द्वारे प्रत्येक शनिवारी सायंकाळी समाजातील लोकांना एकत्र करून उपनिषदाच्या बंगाली भाषेतील प्रवचनांचे वाचन केले जाईल.

Ø २)ब्राह्मो समाजाच्या प्रचारासाठी तर ‘तत्वबोधिनी’  पत्रिका प्रकाशित करण्यात आली. या पत्रिकेचे काम केशवचंद्र सेन यांनी चालवले.

Ø ३)जातीभेद निर्मूलनाचे कार्य करणे .

Ø ब)प्रार्थना समाज :

Ø केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजमधून  बाहेर पडल्यानंतर डॉ. आत्माराम तर्खडकर यांच्या प्रेरणेने १८६७ मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली.

Ø प्रार्थना समाजा मध्ये न्यायमूर्ती चंदावरकर, न्यायमूर्ती रानडे रा गो भांडारकर दादोबा तरखडकर इत्यादींचे महत्त्वाचे योगदान होते.

Ø महिलांच्या हिताला अनुसरून ‘आर्य महिला समाज’ ही सामाजिक संस्था प्रार्थना समाज याद्वारे स्थापन करण्यात आली यामध्ये पंडिता रमाबाई यांचे योगदान महत्त्वाचे होते

Ø प्रार्थना समाजाच्या कार्याला विठ्ठल रामजी शिंदे, नामदार गोखले न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई, नाम जोशी, गोपाळ कृष्ण गोखले, भांडारकर, चंदावरकर, इत्यादींनी विशेष योगदान दिले.

Ø आर्य समाजाच्या द्वारे विधवाविवाह संघाची स्थापना करण्यात आली.

Ø धार्मिक मतभेदाच्या ऐवजी सामाजिक चळवळ निर्माण करणे व अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करणे हे महत्त्वाचे कार्य हाती घेण्यात आले होते.

Ø प्रार्थना समाजाची वैशिष्ट्ये:

Ø जातीभेद नष्ट करणे

Ø  स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणे.

Ø  विधवा पुनर्विवाहाला प्राधान्य देणे.

Ø  स्त्री-पुरुष विवाहाचे वय वाढविणे.

Ø प्रार्थना समाजाचे तत्वज्ञान:

Ø परमेश्वर हा एकच असून तो विश्व निर्माता आहे.

Ø मानवाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.

Ø ३)परमेश्वराला आपलेसे करण्यासाठी उपासना भक्ती सदाचार आणि सत्व या तत्त्वांचा अंगीकार केला पाहिजे.

Ø प्रार्थना करण्याचे करण्याने अध्यात्मिक प्रगती होते.

Ø परमेश्वराला मुर्तीपुजा मान्य नाही पण आपण सर्व इशारा ईश्वराची लेकरे आहोत.

Ø अपंग व अनाथ मुलांच्या सेवेसाठी पंढरपूर येथे आश्रम उभा केला.

Ø ७)विधवा विवाह स्त्री शिक्षण बालविवाह पडदा पद्धती आंतरजातीय विवाह इत्यादीं ना प्रोत्साहन दिले पाहिजे

Ø प्रार्थना समाजाची शिकवण:

Ø एकेश्वरवाद

Ø मूर्तिपूजा अवतार कल्पना अमान्य

Ø भक्ती भावपूर्वक प्रार्थनेचे महत्त्व

Ø आदर्श मूल्यांचे पालन

Ø अन्यायी अनिष्ट दृष्ट प्रथांचा निषेध

Ø प्रार्थना समाजाची साप्ताहिक उपासना:

Ø उद्बोधन

Ø स्तवन

Ø कृतज्ञता

Ø दर्शन

Ø प्रार्थना

Ø निरूपण

Ø प्रार्थना व आरती

Ø ०४ मे१८७३ रोजी ‘सुबोध पत्रिका’ नावाचे प्रार्थना समाजाचे मुखपत्र सुरू झाले. त्याचे ब्रीदवाक्य ‘सत्यमेव जयते’ हे होते. सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी अनाथ स्त्रिया व मुले यांच्या संदर्भात समाजाने विशेष काम केले.

Ø १८७२  मध्ये त्यासाठी बॉम्बे थीईस्टीक  असोसिएशनची स्थापना केली.

Ø १८७६ ला भि ल चव्हाण यांनी मुंबई रात्र शाळा सुरू केली.

Ø विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली.

Ø ना म जोशी यांनी सोशल सर्विस लीग ही कामगारांसाठी ची संस्था सुरू केली तर राजकीय कार्यासाठी भारत सेवक समाज हा राजकीय पक्ष सुरू करण्यात आला. 

Ø क)आर्य समाज:-

Ø स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई या ठिकाणी १८७५ साली आर्य समाजाची स्थापना केली.

Ø स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळशंकर हे होते.

Ø स्वामी दयानंद सरस्वती यांनी मथुरा येथे वेदांचा अभ्यास केला.

Ø आर्य समाजाने शैक्षणिक क्षेत्रात व धार्मिक क्षेत्रात शुद्धीकरण चळवळ चालवली.

Ø शैक्षणिक क्षेत्रामध्ये ‘गुरुकुल’ योजना, वेदांचा प्रचार करण्यासाठी ‘दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची’ स्थापना केली. महाराष्ट्रातील मुंबई कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी शैक्षणिक संस्था सुरू केल्या.

Ø स्वामी दयानंद सरस्वती यांच्या व्याख्यानाचे सारस स्वरूप ज्या  ग्रंथांमध्ये प्रकाशित झाले त्याचे नाव “सत्यार्थप्रकाश” असे आहे.

Ø ब्रिटिश काळात आर्य समाजाचे मुख्य केंद्र हे मुंबई नंतर लाहोर होते.

Ø आर्य समाजाने हिंदू धर्मातून इतर धर्मात प्रवेशित केलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांच्या शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली.

Ø आर्य समाजाची तत्त्वे:

Ø परमेश्वर हा निर्गुण, निराकार, दयाळू, अनंत, सर्वस्पर्शी, शक्तिमान आहे.

Ø  दोन प्रत्येकाने स्वतःच्या उन्नती पेक्षा सर्वांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे.

Ø  अविद्या मुळे सर्वनाश होतो त्यामुळे शिक्षण घेतले पाहिजे.

Ø   मनुष्याने सत्याचा विचार करून वर्तन करावे.

Ø   प्रत्येकाने सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग करावा.

Ø  वेदांचा अभ्यास करून इतरांनाही शिकविणे व वेदांकडे चला असा संदेश दिला पाहिजे. प्रत्येकाने इतरांसोबत प्रेमपूर्वक व धर्मानुसार वर्तन करावे.

Ø आर्य समाजाची शिकवण:

Ø ०१)ईश्वर हा एकच आहे.

Ø ०२)तो विश्वाचा निर्माता आहे.

Ø ०३) मूर्तिपूजा अमान्य आहे.

Ø ०४) समाजात कोणतेही भेदभाव कर्मकांड पुरोहितशाही नसेल पाहिजे.

Ø ०५) हिंदू धर्माचे खरे तत्त्वज्ञान आहे मानवतावादी तत्वज्ञान आहे.

Ø ०६) वेदांचे अध्ययन केल्याने ते आपल्याला प्राप्त करता येईल.

Ø ०७) समाज सुधारणा विषयक कार्य.

Ø ०८) आर्य समाजाने वेदांचा अभ्यास करण्यासाठी गुरुकुल, संस्कृत शाळा सुरू केल्या.

Ø ०९) याशिवाय पाश्चात्य पद्धतीच्या शिक्षणासाठी इंग्रजी महाविद्यालय देखील सुरू केले.

Ø १०)स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

Ø ११)विधवा  विवाहाचा  पुरस्कार केला.

Ø १२)  स्त्रियांच्या  वेद अभ्यासा साठी  आग्रह धरला

Ø १३)जातिभेद निर्मूलन, शुद्धीकरणाची चळवळ, कल्याणकारी जनसेवा, इत्यादी कार्य त्यांनी केले.

 

Ø ड) सत्यशोधक समाज:

Ø  महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

Ø  सत्यशोधक समाजाच्या स्थापना आणि प्रचारामध्ये कृष्णराव भालेराव भालेकर डॉ. विश्राम घुले मारुतराव नरवळे, डॉ. संतूजी लाड, नारायण लोखंडे इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे.

Ø  सत्यशोधक धर्म हा ब्राह्मणेत्तर धर्म म्हणूनही ओळखला जातो.

Ø  ब्राह्मणांच्या शिवाय कोणताही विधी म्हणजेच धार्मिक विधी पार पाडणे यास सत्यशोधक समाजामध्ये महत्त्वाचे स्थान होते.

Ø  १८९० मध्ये महात्मा फुले यांचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी ही चळवळ पुढे नेली. १८९० नंतर छत्रपती शाहू महाराजांचे सत्यशोधक समाज वाढ आणि विकास यामध्ये मोठे बळ मिळाले.

Ø  कोल्हापुरातील सत्यशोधक चळवळ स्थापन करण्यात व तिचा व तिची वाढ करण्यात भाऊराव जाधव, गणपत कदम, हरिभाऊ चव्हाण, लठ्ठे इत्यादींचे योगदान आहे.

Ø  सत्यशोधक चळवळ ही ग्रामीण भागांमध्ये  सत्यशोधकी जलशा, तमाशा, लावणी  इत्यादी मनोरंजनच्या द्वारे प्राचारीत झाली.  

Ø  सत्यशोधक समाजाची तत्त्वे:

Ø  १)सत्यशोधक समाज हा निर्मिक संकल्पना मानतो.

Ø  २) सत्यशोधक समाज ईश्वर आणि समाज यांच्या मधल्या मध्यस्थांना नाकारतो; म्हणजेच तो पुरोहित शाळेच्या विरोधी भूमिका घेतो.

Ø  ३) सत्यशोधक समाज सत्य विचार आणि वर्तनावर विश्वास ठेवतो.

Ø  ४) व्यक्तीच्या जन्मा पेक्षा त्याचे कर्तृत्व महत्त्वाचे मानतो.

Ø  ०५) शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार यास सत्यशोधक समाज प्राधान्य देतो. विशेषतः विशेषतः बहुजन, स्त्रि, शूद्रातिशूद्र इत्यादींच्या शिक्षणाला सत्यशोधक समाज महत्व देतो.

Ø  जातिभेद लिंगभेद आणि धर्म भेद सत्यशोधक समाजाला मान्य नाहीत.

Ø  ०७)सत्यशोधक समाज जाती वर्णन व लिंगाधारित विषमतेला निर्मूलनाचे तत्वज्ञान मानतो.

Ø सत्यशोधक समाजाचे कार्य:

Ø  ०१)सत्यशोधक समाजाने शिक्षणाच्या प्रचारामध्ये विशेषतः स्त्री शूद्र अतिशूद्र म्हणजेच अस्पृश्यांसाठी च्या शिक्षणाच्या प्रचारात आपले विशेष योगदान दिले.

Ø  ०२) ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८  पासूनच शिक्षणाची चळवळ सुरू केली होती.

Ø  ०३) स्त्री शिक्षणाचा साठी मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली.

Ø  ०४) विधवांच्या विवाहाचा आणि त्यांच्या शोषण मुक्तीचा प्रश्न सत्यशोधक समाजाने हाती घेतला होता ज्योतिबा फुले यांनी १८६३  ला बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.

Ø  ०५) जाती निर्मूलन आणि अस्पृश्यता निर्मूलन हा सत्यशोधक समाजाच्या कार्याच्या केंद्रबिंदू होता.

Ø  ०६) शेतकऱ्यांच्या वर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये विशेषतः ब्राह्मणशाही कडून आणि ब्रिटीश शाळेकडून या दोन्ही अत्याचाराच्या विरोधामध्ये सत्यशोधक समाजाने कार्य केले.

Ø  ०७) सत्यशोधक समाजाच्या प्रचारामध्ये “दीनबंधु” या वृत्तपत्राचे विशेष योगदान आहे.

Ø  ०८) ब्राह्मणेतर चळवळीतील दिनकरराव जवळकर, भास्कर जाधव, शंकर मोरे, केशवराव जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादींनी सत्यशोधकी विचारांचा पुढे प्रचार केला.

 

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...